Class 11 Marathi Yuvakbharati -Chapter - 4- Zadanchya manat jau
वर्ग ११ वा, विषय : मराठी पदय ४ झाडांच्या मनात जाऊ
झाडीचे हिरवे वैभव फुलांचे रंग-गंध, भिरभिरणारी फुलपाखरे, थुईथुई नाच ताना हसणारे पाणी, फांदया-फांदयावरील पक्षी, ऊन-सावल्यांची नक्षी या तन्यमय निसर्गसोहळ्याशी कवी एकरूप होऊन जातो. निसर्गातील अम्लान सौंदर्याचा आस्वाद घेता घेता आपणही त्या निसर्गाचा भाग होऊन सौंदर्यानुभूतीचे दान विश्वाला दयावे, असे त्याला वाटत राहते.
स्वाध्याय
- (अ) पोपटी पानात जाण्या साठी.
- (आ) उत्सा हाने सळसळण्या साठी.
- (इ) पानांचे विचार घेण्या साठी.
- (अ) दुसऱ्या ला आनंद देत.
- (आ) दुसऱ्या ला उत्सा ही करत.
- (इ) स्वसमर ्पणातून दुसऱ्या ला आनंद देत.
- (अ) सुगंधी वृत्ती जोपासू.
- (आ) अत्तराचा स्प्रे मारू.
- (इ) कानात अत्तर ठेवू.
- (अ) दारांना तोरणाने सजवू.
- (आ) दाराला हलतेफुलते तोरण लावू.
- (इ) नि सर्गा च्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
उत्तर: - निसर्गाच्या संगतीत स्वत:चे जीवन आनंदी करू.
- (अ) नि सर्गा चाच एक घटक होऊन सर्व ांना भेटेन.
- (आ) झाड होऊन फांद्या पसरीन.
- (इ) झाड होऊन सावली देईन.
निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती |
संदेश
|
(१) कोकीळ होऊनी गाऊ... | तुमच्या कंठातून निसर्गाचे गाणे फुटूदे. |
(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू... | निसर्गाने दिलेली गाणी पाणी होऊन एकरूपतेने गा. |
उत्तर: कवी म्हणतात की माझ्या ओंजळीमधल्या पाण्यात आकाश उतरले आहे. त्यात जेव्हा ऊन मिसळून हिंदकळते, तेव्हा असे वाटते की जणू सूर्य त्या हातातल्या पाण्यात पोहत आहे.
१)कवितेचा विषय | निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे. |
२) कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव | निसर्गाशी एकरूपता. |
३)कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके | :(१) भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा थवा म्हणजे रंगीत पताकांचे तोरण. (२) सावलीला पंख फुटून तिचे कावळे झाले. |
४)भाषिक सौंदर्य स्थळे | :(१) फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी (२) उधाण आनंदाचे की देवाघरची गाणी |
५) कवितेतून मिळणार संदेश | निसर्गातील बहरलेल्या सौंदर्याचा खुल्या मनाने आनंद लुटणे व आपणच निसर्गाचा घटक होऊन निसर्गाशी एकरूप होणे. |
उत्तर : कवी नलेश पाटील यांनी 'झाडांच्या मनात जाऊ' या कवितेमधून वसंत ऋतूतील निसर्गसौंदर्याचे चित्रण उत्कट व भावविभोर शब्दकळेतून साकारले आहे. स्वत: निसर्गाचे घटक होऊन निसर्गसौंदर्याचा कसा आस्वाद घ्यावा, हे सांगताना कवींनी वेगवेगळी व अनोखी प्रतीके वापरली आहेत.
बहरलेल्या झाडाचे वर्णन करताना कवी म्हणतात की झाडाच्या फांदीवर ओळीने बसलेले पक्षी हे या वसंत ऋतूच्या बहरलेल्या मोसमांचे साक्षीदार आहेत. झाडाच्या पायथ्याशी जी सावली आहे ती उन्हावर नक्षी काढत बसली आहे. म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा पानांतून झाडाखाली झिरपतात त्या वेळी पायथ्याशी पसरलेल्या सावलीत त्याची नक्षीदार पखरण होते. मग नक्षीलाच जेव्हा पंख फुटतात तेव्हा सावल्यांचेच कावळे आसमंतात उडताना दिसतात. - 'ऊन-सावलीच्या नक्षीतून निर्माण झालेले काऊ' या प्रतिमेतील ऊन सावली ही प्रतीके सजग होतात. येथे चेतनगुणोक्ती अलंकाराचा लोभसवाणा आविष्कार मनाला प्रसन्न करतो.
उत्तर : 'झाडाच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी वसंत ऋतूत फुललेल्या निसर्ग घटकाचे लोभसवाणे दर्शन नितांत सुंदर प्रतिमांमध्ये उलगडून दाखवला आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात.
वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याची वैभव अनुभवताना कवींना या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टि न्हाऊन निघालेले आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराची किमया असावी, असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभवती आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वत:ची गाणी आहेत. ही सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवींच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की, या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यांत तरळलेले पाणी वेगळे नाही. ते एकच आहे. या झर्यातलेच पाणी माझ्या डोळ्यांत तरळले आहे, अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे. "डोळ्यांत झऱ्याचे पाणी' या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार केली आहे. मानव हा निसर्गाचाच अपत्य आहे, याचे प्रत्यंतर या प्रतिमेतून दिसून येते.
उत्तर : माझे झाडांवर नितांत प्रेम आहे. मला नेहमी झाडाच्या मनात शिरावेसे वाटते. एकदा मी खरेच झाडाच्या मनात शिरलो. मी त्याच्या मुळांपाशी पोहोचलो. त्यांना विचारले की, तुम्ही सतत माती खाली असता. वरती दिसत नाहीत. तुम्हाला तुमच्या वरच्या पिसाऱ्याविषयी काय वाटते? मुळे म्हणाली – "मातीतच आमचा निवास! आम्ही खाली खोलवर जातो. जीवनरस घेतो आणि वरच्या अवयवांना पुरवतो. म्हणून तर फांदया झुलतात, पाने डुलतात नि फुले फुलतात. आम्ही जरी मातीत असलो तरी वरच्या अवयवांचे सर्व लाड आम्हीच पुरवतो. मातीतला गंध आम्ही फुले ओततो. पानांची झळाळी मातीमुळेच दिसते. हे आमचेच वंशज असल्यामुळे त्यांच्या सुखात आमचे सुख सामावलेले आहे. सर्व ऋतूंत आमचे फुलणे, कोमेजणे सुरू राहते. आमची जीवनेच्छा दृढ आहे. त्यामुळे आम्ही कृतार्थ आहोत." झाडांच्या मनात शिरून त्यांचे मनोगत मी जाणून घेतले नि मनोगताला शीर्षक दिले - 'मुळांची मुले!'
उत्तर : मानवी जीवन निसर्गाच्या गर्भातच पोसले जाते. आपल्या आजूबाजूला अफाट निसर्ग पसरलेला आहे. निसर्गाचा व मानवी जीवनाचा अतूट संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनाला समृद्ध करीत असतो. रोज उगवणारा सूर्य जीवनाला ऊर्जा देतो नि चंद्र शीतल चांदणे देतो. डोंगरातून नदी उगम पावते नि काठावरच्या गावांची तहान भागवते. ही धरती मानवांसाठी अन्नाची निर्मिती करते. जमिनीवर उगवलेली वनश्री मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते. पशु-पक्षी पर्यावरणाची शुद्धता राखतात, तर गुरेढोरे मानवाच्या कष्टात सामील होतात. वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते. सारा आसमंत मानवी जीवनासाठी नि:स्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो. या चराचरातील निसर्ग मानवी जीवनाचे संवर्धन करतो. या निसर्गाविषयी मानवी जीवन कृतार्थ होऊन सदैव कृतज्ञ राहिले आहे.
उत्तर : 'झाडांच्या मनात जाऊ' ही कवी नलेश पाटील यांची कविता 'हिरवं भान' या कविता संग्रहातील घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवींनी रंगवला आहे. झाडांच्या मनात शिरून त्याचे हृदगत जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे, असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाणे दर्शन या चराचरातील वनश्रीत कसे झाले आहे, याचे वर्णन कवींनी अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दुग्गोचर केले आहे. फुल पाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यांत झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पोहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ' अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकांतून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे व कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. 'ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक' ही कवींची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे.
निसर्ग चित्र रेखाटतांना अम्लान शब्द कळे तून उमटलेला उत्कट भाव - रसिकांना मोहन टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पावून निसर्ग डोळ्यांत व हृदयात साठवतो आहोत, अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्हसित प्रतिमांतून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतरा असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रासाद व माधुरी या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली.