संत ज्ञानेश्वर (१२७५ ते १२९६) :
श्रेष्ठ संत. प्रज्ञावंत तत्त्वज्ञ. अलौकिक प्रतिभावंत कवी. सर्व जगाला सन्मार्गाचा संदेश देणारे संतकवी. तत्त्वज्ञान, आत्मविचार, साक्षात्कार, काव्यसौंदर्य, कल्पनावैभव आणि रसाळपणा या दृष्टीने त्यांनी लिहिलेला अजोड ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी' होय. 'अमृतानुभव', 'चांगदेवपासष्टी', 'अभंगगाथा' हे त्यांचे ग्रंथ सुप्रसिद्ध आहेत. तत्त्वज्ञान, भक्ती आणि काव्य यांचा अपूर्व संगम संत ज्ञानेश्वरांच्या रचनांमध्ये आढळतो. संत ज्ञानेश्वरांच्या लेखनातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन घडते.विनयशील वृत्ती, अतुलनीय गुरुभक्ती, असीम करुणा, मातृहृदयी वात्सल्य, अजोड रसिकता असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू दिसून येतात.
प्रस्तुत ओव्यांतून मराठी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त झाला आहे. अमृतापेक्षाही गोड असलेल्या मराठी भाषेविषयीची गौरवाची भावना आणि आपल्या शब्दसामर्थ्यावर असणारा सार्थ विश्वास व्यक्त करताना संत ज्ञानेश्वर म्हणतात, "माझ्या मराठी अमृताशी ही पैज जिंकणारी अशी रसाळ अक्षरे मी निर्माण करीन. " रसाळ बोलीत निर्माण केलेल्या या ओव्या म्हणजे मोठी मेजवानी आहे. या ओव्यांमध्ये रसाळ बोलांना दिलेली सूर्याची उपमाही विशेष परिणामकारक आहे.
स्वाध्याय
(१) (अ) कृती करा:
संत ज्ञानेश्वरांच्या भाषेची वैशिष्ट्ये
(१) अमृताशी पैजा जिंकणारी
(आ) रसाळ बोलांचा विविध इंद्रियांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन तक्ता पूर्ण करा :
इंद्रिये |
परिणाम
|
(१) कान
|
जीभा होतात
|
(२) जीभ
|
आमचा रस आहे.
|
(३) नाक
|
सुगंध येतो
|
(४) डोळे
|
- पाहून तृप्ती लाभते
|
इंद्रियेतर
|
परिणाम
|
(१)मन
|
बाहेर धावते
|
(२)भुजा
|
आलिंगन द्यायला सरसावतात
|
(इ) 'रसाळ बोल' आणि 'सूर्य' यांच्या कार्याच्या माध्यमातून पुढील तक्ता पूर्ण करा :
रसाळ बाळांचे कार्य |
सूर्याचे कार्य
|
(१) व्यापकपण | (१) सर्वत्र पसरतो |
(२) सर्व इंद्रियांचे उत्तम प्रकारे समाधान | (२) चराचराला उजळतो |
(२) अर्थ स्पष्ट करा :
(अ) माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेही पैजा जिंके।
उत्तर: माझा मराठीचा बोल (शब्द) मला कौतुकाचा वाटतो. अमृताशी जरी पैज लावली, तरी माझा मराठीचा बोल ती पैज जिंकेल. कारण अमृता पेक्षा माझ्या मराठी भाषेत गोडवा व माधुर्य अधिक आहे.
(आ) वेधे परिमळाचें बीक मोडे। जयाचेनि ।।।
उत्तर: माझ्या मराठी शब्दांची इतकी कोमलता आहे की, त्यातून फुलासारखा सुगंध येतो. हा सुगंध असा आहे की, प्रत्यक्ष फुलातल्या सुगंधाचे बळ त्याच्यापुढे तोकडे पडते. इतकी माझी मराठी भाषा गंधित आहे.
(३) चौकटी पूर्ण करा :
(अ) रसाळ बोलाला या रचनेत दिलेली उपमा
उत्तर: श्रवणाच्या जिभा होतात
(आ) रसाळ बोलांचा इंद्रियांवर होणारा परिणाम
उत्तर:) इंद्रियांत भांडण लागते
(इ) सर्व जगाला जागवणारा
उत्तर: सहस्रकर (सूर्य)
(४) (काव्यसौंदर्य)
खालील ओव्यांतील भावसौंदर्य स्पष्ट करा :
(अ) ऐका रसाळपणाचिया लोभा । की श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंबा । एकमेकां ।। ३ ।।
उत्तर : 'ऐसी अक्षरें रसिकें' या ओव्यांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेची महती सांगितली आहे. मराठी भाषेचे सौंदर्य व गोडवा सांगताना ते म्हणतात की मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड व मधुर आहे. ।
प्रस्तुत ओवी मध्ये संत ज्ञानेश्वरांना मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी भाष्य करायचे आहे. ते म्हणतात की, माझी मराठी भाषा इतकी रसाळ आहे की तिच्या रसाळपणाच्या मोहाने कानालाही जिभा फुटतात. म्हणजे कानाला ती जिभेप्रमाणे आस्वादावीशी वाटते. एवढेच नव्हे तर प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा स्वत: आस्वादावीशी वाटते, यासाठी सर्व अवयवांमध्ये व पंचेंद्रियांमध्ये प्रेमळ भांडण जुंपले आहे. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा आपलीशी वाटते. ।
प्रस्तुत ओवीमध्ये मराठी भाषेच्या रसाळपणाविषयी पराकोटीची कल्पना करून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला एकमेवाद्वितीय ठरवली आहे.
(२) "तैसें शब्दांचे व्यापकपण। देखिजे असाधारण।
पाहातयां भावाज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥ २ ॥
उत्तर : संत ज्ञानेश्वर यांनी 'ऐसी अक्षरें रसिकें' या ओव्यांमध्ये मराठी भाषेची थोरवी भावपूर्ण शब्दांत व्यक्त केली आहे. सर्व इंद्रियांना हवीहवीशी वाटणारी माझ्या मराठी भाषेची गोडी जाणकार रसज्ञांना कशी भावते, याचे यथोचित वर्णन उपरोक्त ओवीमध्ये त्यांनी केले आहे.
संत ज्ञानेश्वर मराठी भाषेची महती सांगताना म्हणतात- सूर्य जसा चराचराला उजळून टाकतो तशी मराठी भाषेला बिलगणाऱ्या सर्व अवयवांना ती उत्तम प्रकारे समाधान देते. असे मराठी शब्दांचे विस्तारलेपण, अथांगपण असामान्य असे आहे. चिंतामणी हे रत्न जसे सर्व माणसांची मनोइच्छा पूर्ण करण्यास सक्षम आहे, तसे मराठी बोल हे सर्व रसिकज्ञांना व जाणकारांना मनोमन भारतात. 'भावज्ञांना मराठी भाषेत चिंतामणी चे सगुण सापडतात.
मराठी शब्दांच्या व्यापकपणाची व अर्थ सघनतेची यथोचित महती सांगताना संत ज्ञानेश्वरांचा मराठी भाषेविषयीचा दृढ व प्रगाढ आत्मविश्वास या ओवी मध्ये प्रत्ययास येतो.
(५) (अभिव्यक्ती)
मराठी भाषेची थोरवी तुमच्या भाषेत लिहा.
उत्तर : 'मराठी असे आमुची मायबोली.' माझी मातृभाषा 'मराठी' मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडीच आहे ! मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, कवी केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींनी तिला शब्दलेण्यांनी साकारलेली आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण,
भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत, पंत आणि तंत परंपरेने तिला नटवलेली आहे. इतर कलांनी तिला सजवलेली आहे. मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे. मराठी बोलीभाषेचे
ठिकठिकाणच्या प्रदेशांतील झरे प्रमाण मराठीच्या नदीत मिसळून मराठी गंगा अविरत वाहते आहे व काठांवरील लोकसंस्कृतीला जगवते आहे. मराठी भाषेतील लोकगीते व बोधकथा ही मराठी संस्कृतीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे.
'माझा मराठीचा बोल
वाजे काळजात खोल
ओवीमधून पाझरे
निळ्या अमृताची ओल'
प्रा. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा
सार्थ अभिमान अधोरेखित होतो.
(६) 'ऐसी अक्षरे रसिकें' या रचनेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
मराठी भाषेचा गौरव करताना व शब्दांची महती सांगताना संत
ज्ञानेश्वर म्हणतात.
कौतकास्पद असलेला माझा मराठीचा बोल (शब्द) अमृताशीही
पैज जिंकणारा आहे. अशी रसाळ अक्षरे मी मराठीत निर्माण करीन. ||१||
या शब्दांची कोमलता इतकी आहे की त्यांच्यापुढे संगीताचे रंगही
फिके पडतात. माझ्या शब्दांना इतका गंध आहे की त्यापुढे (फुलांच्या)
सुगंधाचेही बळ तोकडे पडते, सुगंधाचेही गर्वहरण होते. ।। २ ।।
मराठी भाषेच्या रसाळपणाचा इतका मोह होतो की, कानांना जिभा
फुटतात. श्रवणाला स्वाद येतो. शरीराचे सर्व अवयव (इंद्रिये)
एकमेकांशी भांडू लागतात. प्रत्येक इंद्रियाला मराठी भाषा केवळ
आपलीच आहे, असे वाटू लागते. ।। ३ ।।
खरे म्हणजे, शब्द हा श्रवणाचा (ऐकण्याचा) विषय आहे. परंतु
जीभ म्हणते की, तो रस (शब्द) माझा आहे. मला आस्वादायचा
आहे. नाकाला तर शब्दांचा सुगंध येऊ लागतो. त्यामुळे नाक म्हणते
शब्द हा माझा विषय आहे.।४ ।
या रेखेच्या वाहणीचे (शब्दांचे) नवल असे की हे शब्दचित्र पाहून
डोळ्यांची तृप्ती होते. डोळ्यांचे पारणे फिटते. डोळे म्हणतात की
आमच्यासाठीच हे सौंदर्याचे भांडार खुले केले आहे.।। ५ ।।
जेव्हा संपूर्ण सार्थ शब्द उभा ठाकतो, तेव्हा मन त्याला
आस्वादण्यासाठी शरीराबाहेर झेप घेते आणि हात त्याला मिठीत
घ्यायला पुढे सरसावतात. हातांना आलिंगन दयावेसे वाटते. ।। ६ ।।
अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापल्या परीने शब्दाला बिलगतात आणि
'शब्दही उत्तम प्रकारे सर्व इंद्रियांचे समाधान करतो. ज्याप्रमाणे एकटा
सूर्य चराचराला उजळतो.।।७।।
त्याप्रमाणे माझ्या मराठी शब्दाचे असामान्य, अलौकिक असे
व्यापकपण, विस्तार, अफाटपणा आहे. जाणकार रसिक लोकांना तर
मराठी भाषा ही हरएक इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणी सारखी भावते,
पसंतीस येते. ।। ८ ।।
हे असो. तर मी या मराठी शब्दांची शिगोशीग ताटे भरली आहेत.
त्यावर कैवल्यरस वाढला आहे. अशी निष्काम कर्मयोगाची मेजवानी
मी तयार केली आहे.।।९।।
आता या नित्य नूतन आत्मप्रकाशाची समई (दीपज्योती) मी तेवत
'ठेवली आहे. मराठी भाषेची ही अक्षय संपदा जो इंद्रियातीत, इंद्रियांच्या
पलीकडे जाऊन नि:संगपणे आस्वादेल, त्यालाच ती प्राप्त
होईल.।।१०।।
आता श्रोतेहो एक गोष्ट करा, मी निरूपण करीत असलेली मराठी
भाषेची थोरवी ऐकण्याच्याही पलीकडे जाऊन मनाने आत्मरत होऊन
आस्वादा. (हा कैवलरस मोदक तुम्ही मनाने अनुभव.)।। ११ ।।